उरण : उरण विधानसभा मतदार संघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत मोहपे येथे साकारणाऱ्या ५० लाख रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. १५)संपन्न झाला.
वास्तविक आमदार महेश बालदी यांनी पाठपुरावा करून हि योजना अंमलात आणली असताना त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न माजी आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील यांनी केला. मात्र नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला असून येथील ग्रामस्थांनी केंद्र सरकार तसेच आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याने समृद्ध करण्यासाठी जलजीवन मिशन केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत जलसंकटही वाढत असून ही समस्या लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१९ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर एक भव्य योजना सुरू केली. त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मोहपे येथील नळपाणी पुरवठा योजनेसाठी आणला. या योजनेच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ आज आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, राकेश गायकवाड, आत्माराम हातमोडे, माजी सरपंच आशा म्हसकर, युवानेते प्रविण ठाकूर, योगेश लहाने, अनिल पाटील, राजेश लबडे, तानाजी पाटील, महेंद्र गोजे, अनिल भोईर, अशोक भोईर, सचिन पाटील, वामन पवार, संकर पवार, नामदेव पवार, आदेश पवार, सुनील दळवी,प्रकाश म्हसकर, उमेश पवार, चेतन पाटील, जगन पाटील, राकेश ठाकूर, संभाजी पाटील, हरी पवार, सखाराम पवार, दत्ता पवार, मंदार चोरघे, विनायक पवार, प्रतीक पवार, निखिल पवार, किसन पवार, विवेक पवार, शरद पवार, पांडुरंग पवार, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मोहपेत ५० लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर
More from RaigadMore posts in Raigad »







