खारघर शहरात वाहतूककोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सकाळ संध्याकाळी नोकरीधंद्यासाठी जाण्या येण्याच्या मुळातच नव्हे तर संपूर्ण दिवसभर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.खारघरसारख्या सुनियोजित शहरामध्ये असे होणे अपेक्षित नाही.
शहरातील वाहतूक कोंडीबाबत तक्रारी घेऊन नागरिक भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात येत असतात.नागरिकांची नेहमीच प्रमुख तक्रार असते की कुठेतरी आडबाजूचं दबा धरून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना अडवून चलन केल जाते.शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर हेल्मेटची सक्ती योग्य नाही,असे रहिवाश्याचे म्हणणे असते.अनेक ज्येष्ठ नागरिकांची तक्रार अशी आहे की त्यांनाही हा त्रास सहन करावा लागतो.असे दृश्य काही विशिष्ट नाक्यांवर दैनंदिन झाले आहे.
सदर बाबतीत खारघर वाहतूक पोलिसांमार्फत ठोस कार्यवाहि व्हावी व वहातुक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा शहर मंडळाचे पदाधिकारी व नगरसेवक यांनी पोलिस उपायुक्त वहातुक शाखा नवी मुंबई श्री.पुरुषोत्तम कराड साहेब यांना निवेदन दिले.तसेच सदर तक्रारीचे निवेदन वरिष्ठ पोलिस निरीक्षक वहातुक शाखा खारघर शहर श्री.योगेश गावडे यांनाहि भेटून देण्यात आले.
श्री योगेश गावडे यांनी ही मान्य केले की आपण नमूद केलेल्या ठिकसणी वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूककोंडी होत आहे व वाहतूक वाहती ठेवणे हे वाहतूक पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे.पुढील दिवसांमध्ये योग्य त्या सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना देऊन वाहतूककोंडी होणार नाही व नागरिकांचा त्रास कसा कमी होईल याची आम्ही काळजी घेऊ,असे आश्वासन दिले.तसेच नागरिकांनीही पोलीस दलास योग्य नियमांचे पालन करीत सहकार्य करावे.गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीस कारणीभूत होतील अशा पध्दतीने वाहने रस्त्यात उभी करू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या संदर्भात काही विशिष्ट ठिकाणी जेथे वाहतूककोंडी जास्त प्रमाणात होते तेथे सुचना फलक लावावेत तसेच वाहतूक पोलिस नियुक्त करावेत अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.या वेळी खारघर तळोजा शहर मंडळाचे अध्यक्ष श्री ब्रिजेश पटेल,मा.नगरसेवक श्री.शत्रुघ्न काकडे,उपाध्यक्ष श्री.दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे व श्री.अशोक जहांगीर उपस्थित होते.

वाहतूक कोंडी ! खारघर शहरात वाहतुकीची समस्या गंभीर !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर




