पनवेल : बेस्टतर्फे वाशी ते मुंबई विमानतळ यादरम्यान २४ तास वातानुकूल AS-881या क्रमांकाची बससेवा चालू करण्यात आली आहे. वाशीहून व विमानतळावरुन दर तासाला या बसेस सुटत आहेत.T1 व T2 दोन्हि टर्मिनल्स येथे वाद्रे कुर्ला संकुलामार्गे जाणार्या या बसेसना साधारण १तास१५ मि.चा वेळ लागतो.यासाठि प्रवास शुल्क रु.१५० इतकेच असून सामानाचे शुल्क आकारण्यात येत नाहि.हि बससेवा नवी मुंबईतून मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिशय सोयीची असून उबेर,ओला,टँक्सी सारख्या महागड्या सेवांपेक्षा किती तरी पटीने स्वस्त व किफायतशीर आहे.
भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजेश पटेल यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर माननीय सौ कविता चौतमोल यांना खारघरवासियांच्यावतिने एका निवेदनाव्दारे मागणी केली आहे की सदर सेवा खारघरपर्यंत विस्तारित केल्यास खारघरच्या रहिवाशांसहित बेलापूर नेरुळ जुईनगर सानपाडा येथील प्रवाशांना सदर बससेवेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.
या बससेवेची उपयुक्तता ध्यानात घेवून सदर सेवेचा लाभ पनवेल महानगर परिसरातील प्रवाश्यांनाहि व्हावा यासाठि सेवा खारघर शहरा पर्यंत विस्तारित करावी अश्या आशयाचे मागणीचे पत्र महापौर सौ.कविता चाैतमोल यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पाठविले आहे.

खारघर ते मुंबई विमानतळादरम्यान बस सेवा सुरु करावी : खारघर भाजपची मागणी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर




