पनवेल : नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होत असल्याकारणाने पनवेल महानगरपालिकेच्या कर संकलनात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काल २६ जुलै रोजी एकाच दिवशी तब्बल १ कोटी ५६ लाख ५३ हजार ८८६ रुपयांचे कर संकलन झाले. आत्तापर्यंत एकुण २२ कोटी २६ लाख ७० हजार ६२७ रूपयांचे कर संकलन झाले असून नागरिकांचा कर भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे. दरम्यान महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे ३१ मार्च २०२३ च्या ऐवजी ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या कालावधीमध्ये कोणतीही शास्ती ,दंड, व्याज आकारण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
पनेवल महानगरपालिकेने सुधारीत मालमत्ता कर आकारणीला सुरूवात केली आहे. गेले काही दिवसापासून खारघरमध्ये मालमत्ता करांवर प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या सुनावण्या घेण्यात येत होत्या. गेल्या शुक्रवारी( 23 जुलै) या सुनावण्या पुर्ण झाल्या असून या वेळी नागरिकांच्या सर्व शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न पालिकेच्यावतीने करण्यात आला .
तसेच गेल्या शनिवार, रविवार सुट्ट्यांच्या दिवशी खारघर मधील उन्नती को ऑपरेटिव्ह सोसायटी,प्लॉट नं ६९ , शहा आर्केड, गॅलेक्सी अपार्टमेंट, सेक्टर ३५ याठिकाणी नागरिकांच्या मालमत्ता करासंदर्भात बैठका घेण्यात आल्या. यावेळी नागरिकांच्या नावामध्ये,पत्त्यामध्ये, सोसायटीच्या नावात,सदनिका नंबर यामध्ये त्वरीत दुरूस्ती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मालमत्ता कर योग्य असल्याबद्दलची खात्री त्यांना पटतअसल्याने मालमत्ता भरणामध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
३१ जुलै पर्यंत मालमत्ता करांवर सूट असल्याकारणाने नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत मालमत्ता कर भरावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

पनवेलमध्ये एकाच दिवशी दीड कोटीच्यावर कर संकलन ! नागरिकांनी वेळेत कर भरावा : आयुक्त गणेश देशमुख !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती




