पनवेल : कोरोना काळ असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेने करांमध्ये सवलत देण्याचे सोडून अन्यायकारक रित्या वाढ केलेली आहे याविरुद्ध आज खांदा कॉलनी रहिवासीयांनी एकत्र येत निषेध नोंदवला. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स न भरण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले आणि जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही , शेकाप नागरिकांच्या पाठीशी भक्कम पणे आहे असे सांगितले.
पनवेल महानगर पालिकेने आतापर्यंत फक्त कचराच सिडकोकडून हस्तांतरित करून घेतलेला आहे आणि त्यातही मोठा भ्रष्टाचार कचरा उचलण्याचे टेंडर मध्ये केलेला आहे असे असताना सुद्धा महानगरपालिका अन्यायकारक रित्या टॅक्स लावत आहे असे शेकाप नेते वाघमारे यांनी लोकांच्या निदर्शनास आणले. आता तरी सत्ताधाऱ्यांनी जागे होऊन सर्वसामान्य नागरिकावर लावलेला अन्यायकारक मालमत्ता कर रद्द करून, दुहेरी कराच्या विरुद्ध योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा खांदा कॉलनी येथील रहिवासीयांच्या बैठकीत मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी व्यक्त केली. पनवेल महानगरपालिकेने सर्वप्रथम खांदा कॉलनी करांना योग्य त्या आरोग्य सेवा पुरवाव्यात जेणेकरून कोरोना चे रुग्ण वाढणार नाहीत त्यासाठी प्राधान्य द्यावे त्यानंतर इतर सुविधा पुरवाव्यात त्यानंतरच कर लावावा अशी अपेक्षा शेकाप नेते अनिल बंडगर यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेविका सौ सारिका भगत , माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष श्याम लगाडे , सचिव महेंद्र कांबळे ,शेकाप युवा नेते अतुल भगत ,मंगेश अपराज , शेकडो नागरिक आणि सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अन्यायकारक कराच्या विरुद्ध खांदा कॉलनीकरांची वज्रमूठ ! विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे मार्गदर्शन !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती




