नवी मुंबई : सिवुड्स – दारावे प्रभाग क्रमांक ९२ आणि ९९ मधील नागरी समस्या तातडीने सोडवाव्यात , अशी मागणी नगरसेवक सुनील पाटील यांनी नवी मुंबई मनपाचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
लोकनेते तथा आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी नवी मुंबईतील विविध नागरी समस्यांबाबत आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी नगरसेवक सुनील पाटील यांनी आपल्या विभागातील विविध प्रश्न मांडले व तातडीने सोडविण्याची मागणी केली. सिवुड्स- दारावे ९२ आणि ९९ मधील उद्यान, पदपथ , गटारे ,विद्युतविषयक अनेक समस्या मांडल्या. वीज कंपनी संदर्भात अनेक प्रश्न मांडले. सिवुड्स – दारावेमध्ये विजेचा लपंडाव नेहमी सुरु असतो. याबाबत वीज कंपनीची समन्व्य साधून येथील प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सुनील पाटील यांनी केली आहे.

सिवुड्स- दारावेमधील नागरी समस्या तातडीने सोडवा ! नगरसेवक सुनील पाटील यांची मागणी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती




