पनवेल(प्रतिनिधी) रसायनी परिसरातील नागरिकांना कायम मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली गुळसुंदे येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस गटविकास अधिकारी श्री. तेटगुरे, पाणी पुरवठा अधिकारी श्री. चव्हाण, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिचंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, माजी सरपंच आर. डी. पाटील, माजी उपसरपंच यशवंत जाधव, सदस्य मनोज पवार, सदस्या प्रभावती कार्लेकर, उपासना गोठळ यांच्यासह इतर सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते. गुळसुंदे, लाडिवली, आकुळवाडी, तुराडे, कष्टकरीनगर, वावेघर, सावळे, देवळोली, दापिवली व परिसरातील इतर गावांना नियमित व मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे यासाठी आमदार महेश बालदी यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने या गावांना परिसरातील कोणत्या जलस्त्रोतातून पाणी मिळविता येईल व त्यासाठी उपाययोजना करण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यानुसार येत्या काही दिवसांतच पंचायत समितीचे अधिकारी या संदर्भात अहवाल देणार असून मुबलक व नियमित पाणी पुरवठ्यासाठी कार्यवाही होणार आहे.

नियमित व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी आमदार महेश बालदी यांचा पुढाकार
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर
- उलवे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !
- जागतिक योग दिनानिमित्त प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक उत्साहात ! आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; युवकांना दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश !
- सरकारच्या विकास, विश्वास आणि जनकल्याणाच्या प्रवासाची 12 वर्षे : विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – मंत्री ऍड. आशिष शेलार




