पनवेल : झाडे नष्ट झाल्यामुळे ग्लोबल वाॅर्मिंगच्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन न केल्यास सगळीकडे हाहाकार उडेल व मनुष्यासोबतच पृथ्वीवरील सगळया जीवजंतुंचे अस्तित्वच धोक्यात येईल. हे होऊ नये यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत. या प्रेरणेतुन सोमवार ९ ऑगस्ट रोजी मुर्बीगांव येथील श्री.गांवदेव मंदिर येथे वृक्षारोपण करण्यlत आले . त्याप्रसंगी मोठया संखेने तरुण वर्ग, लोकप्रतिनिधी, विवीध पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि निसर्ग प्रेमींउपस्थित होते. महत्वपूर्ण बाब म्हणजे प्रत्येकजण आपले स्वत:चे एक झाड घेवुन आले आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वतः घेतली आहे. ग्रामस्थ मंडळ मुर्बी यांनी सदर उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

माझे झाड , माझी जबाबदारी ! ग्रामस्थ मंडळ मुर्बी यांच्यावतीने वृक्षारोपण !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती




