Press "Enter" to skip to content

अष्टपैलू व्यक्तिमत्व : सुरदासदादा गोवारी !

-पनवेल शहर राष्ट्रवादीचे कणखर नेतृत्व !

  • पनवेलच्या शैक्षणिक वाटचालीत योगदान !
  • एक यशस्वी उद्योजक म्हणून ठसा उमटविला !

पनवेल : संजना महाडिक

अफाट कष्टातून घडलेली माणसे कोणत्याही संकटात ठामपणे उभी असतात. कारण त्यांच्या कष्टाला मातीचा सुगंध असतो. अशी माणसे आपल्या कतृत्वाने मोठी होतात. त्यांचे व्यक्तिमत्व आभाळा इतक्या उंचीचे बनते. मात्र, त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. कारण त्यांचे ऋणानुबंध कायम मातीशी जुळलेले असतात. आपल्या माणसांशी जुळलेले असतात. अशी माणसे समाजात फार हाताच्या बोटाने मोजण्याइतकी असतात. असेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे रायगड जिल्ह्यातील पनवेलचे सुपुत्र सूरदासदादा गोवारी होय.

माणसाला परिस्थिती घडवत असते. मुळात माणसाच्या संघर्षाचा काळ हा त्याचा खरा मार्गदर्शक असतो. कारण ती वेळ माणसाला संकटात संघर्ष करायला, लढायला शिकवते. यातून निर्माण झालेले व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थाने समाजाला दिशादर्शक ठरते. एक भारदस्त व्यक्तिमत्व , रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे नेते, कणखर सामाजिक माणूस , राष्ट्रवादीचे नेते, शिक्षणकर्मी , उत्तुंग व्यक्तिमत्व आणि सर्वसामावेश नेतृत्व म्हणजे सुरदासदादा गोवारी होय. प्रेमळ स्वभाव , सामाजिक दायित्व सांभाळणारे एक संयमी असे सूरदासदादांचे व्यक्तिमत्व आहे. अफाट कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणाच्या जोरावर सूरदासदादांनी बिकट परिस्थितीला नमविले. आयुष्यभर कष्ट सोसले, पण शिक्षण थांबविले नाही. कोणत्याही कामाला कमी न लेखता कष्टाची अनेक कामे प्रामाणिकपणे केली केली. एक प्रामाणिक कार्यकर्ता, एक सच्चा समाजसेवक, राष्ट्रवादीला पनवेलमध्ये उभारी देण्यासाठी धडपडणारा एक प्रामाणिक नेता, एक यशस्वी उद्योजक आणि रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीत भरीव योगदान देणारा शिक्षण महर्षी, अशी ओळख सूरदासदादांची आहे. सूरदासदादांच्या कार्यात समाज हाच केंद्रस्थानी आहे. म्हणून त्यांच्या सामाजिक दायित्वाला सलाम. वाढदिवसानिमित्ताने कोकण दर्पण टीमकडून मनभरून शुभेच्छा !

परिस्थिती कितीही बिकट असली तरी शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे याचा आदर्श म्हणजे सुरदासदादा गोवारी आहेत. पनवेल तालुक्यातील कामोठे गावचे सुरदासदादा मूळ भूमिपुत्र आहेत. नवी मुंबई वसण्यापूर्वी येथील मूळ व्यवसाय हा शेती, मच्छिमारी, मिठागरे यांचा होता. आयुष्यभर कष्ट करण्याची येथील परंपरा. मात्र , या संघर्षाच्या काळात देखील सुरदासदादांनी शिक्षण पूर्ण केले. शेतीचे काम केलेच , पण रिक्षा आणि रूटिझमचे काम देखील केले. संघर्षाच्या काळात त्यांची जिद्द , चिकाटी, प्रामाणिकपणा आणि ध्येयवाद त्यांना यशाकडे घेऊन गेला. अंधाराला छेद देऊन प्रकाशाचा मार्ग शोधला. एक यशस्वी उद्योजक म्हणून सुरदासदादांनी आपली ओळख निर्माण केली. संघर्षात देखील आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत हि शिकवण सूरदासदादांच्या व्यक्तिमत्त्वातून नक्कीच तरुणपिढीला मिळते. सामाजिक भाण , सामाजिक जबाबदारी, सामाजिक जाणीव सूरदासदादांच्या कार्यात सातत्याने दिसते. समाजकरण करताना राजकारणात सक्रिय झाले. कामोठ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कमान हाती घेतली. पनवेल आणि रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उभारणीत सुरदासदादांचे योगदान महत्वपूर्ण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आहेत. समाजकारण , राजकारण आणि व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरु असताना सुरदासदादांनी शिक्षणक्षेत्रात पाऊल टाकले. पनवेल तालुक्यातील आणि प्रामुख्याने कामोठे परिसरातील भूमिपुत्र शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मुलांनी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेतले पाहिजे , हि सामाजिक भूमिका , सामाजिक जाणीव बाळगून सुरदासदादांनी कामोठे येथे डी जी गोवारी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज सुरु केले.
सुरदासदादांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास असाच अखंडपणे यशस्वी राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा !

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »