नवी मुंबई : खारघर शहरातील अनेक ठिकाणी वाढलेले घाणीचे साम्राज्य आज अखेर हटविण्यात आले. सिडको आणि पनवेल महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खारघर शहर अध्यक्षा राजेश्री कदम यांनी खारघरमध्ये स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला.
खारघर मधील इ विंग लगत असलेल्या अनेक होसिंग सोसायटीद्वारे वारंवार मागणी होत होती. विभागातील पदपथ ,मोकळी जागा तसेच रस्त्यावर कचरा टाकून घाणीचे थर साचले होते. यामुळे दुर्घनधीचे प्रमाण वाढले होते. पावसाळा सुरु झाल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील वाढला होता. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने राजश्री कदम यांनी सिडको आणि पनवेल मनपा प्रशासनाला येथील प्रश्नाची माहिती दिली. परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य तातडीने हटवावे, अशे मागणी केली. प्रशासनाने राजेश्री कदम आणि गणेश शितोळे, मृणाल कदम यांचे आभार मानले.

अखेर, खारघरमधील घाणीचे साम्राज्य हटविले ! राजेश्री कदम यांचा पाठपुरावा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भव्य पदयात्रा उत्साहात
- माणगाव घटनेप्रकरणी दोन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल ! शरद सावंत यांच्या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून तपास सुरु ! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची माहिती !
- पत्रकार परिषद ! माणगाव 10 लाख खंडणी प्रकरण ! पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ! माणगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची चौकशी करा ! मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे शरद सावंत यांची मागणी !
- सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त कुटुंब’ संकल्पगुढी; ढोलताशा-लेझीम, महाराष्ट्रीयन पोशाखातील रॅम्प वॉकने नववर्षाचा उत्सव रंगला




