नवी मुंबई : खारघर शहरातील अनेक ठिकाणी वाढलेले घाणीचे साम्राज्य आज अखेर हटविण्यात आले. सिडको आणि पनवेल महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खारघर शहर अध्यक्षा राजेश्री कदम यांनी खारघरमध्ये स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला.
खारघर मधील इ विंग लगत असलेल्या अनेक होसिंग सोसायटीद्वारे वारंवार मागणी होत होती. विभागातील पदपथ ,मोकळी जागा तसेच रस्त्यावर कचरा टाकून घाणीचे थर साचले होते. यामुळे दुर्घनधीचे प्रमाण वाढले होते. पावसाळा सुरु झाल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका देखील वाढला होता. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने राजश्री कदम यांनी सिडको आणि पनवेल मनपा प्रशासनाला येथील प्रश्नाची माहिती दिली. परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य तातडीने हटवावे, अशे मागणी केली. प्रशासनाने राजेश्री कदम आणि गणेश शितोळे, मृणाल कदम यांचे आभार मानले.

अखेर, खारघरमधील घाणीचे साम्राज्य हटविले ! राजेश्री कदम यांचा पाठपुरावा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती




