Press "Enter" to skip to content

महावितरणचा भोंगळ कारभार, उन्हाळ्यात तब्बल ५ तास वीज खंडित !

अन्यथा, एकाही अधिकाऱ्याला कार्यलयात
येऊ देणार नाही : नगरसेविका नेत्रा पाटील !

नवी मुंबई : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे उन्हाळ्यात रात्रीच्या वेळात तब्बल ५ तास विजेशिवाय राहण्याची नामुष्की खारघरवासीयांवर ओढावली . कडक उन्हाळा आणि जीवघेण्या गर्मीत मध्यरात्रीस विज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी नागरिक यांना विशेषत्वाने नाहक त्रास झाला. खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी वीज कंपनीच्या अशा भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवला आहे.

खारघर सेक्टर १९ परिसरात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. मात्र, महावितरणचा कारभार त्यांच्या सोयीनुसार सुरु असतो, अशी खरमरीत प्रतिक्रिया यावेळी किरण पाटील यांनी व्यक्त केली. काल रात्री व आता देखील खारघर सेक्टर १९ मध्ये वीज पुरवठा बंद आहे महावितरणच्या सहाय्यक अभियंता श्रीमती कदम यांच्या सांगण्यानुसार केबल नादुरुस्त असल्यामुळे वीज पुरवठा बंद होता. ८ मे रोजी तर रात्री ११ ते सकाळी ४ या वेळेत वीजपुरवठा बंद होता. रविवारी देखील वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे उन्हाळ्यात कसे राहायचे, रात्रीचे बिनाविजेचे कसे जगायचे असा प्रश्न सर्वसामान्य वीज ग्राहक विचारत आहेत.
विजेचे बिल भरले नाहीतर तात्काळ वीजपुरवठा खंडित करणारे महावितरण रात्रभर रहिवाश्यांना अंधारात ठेवत आहेत. स्थानिक नगरसेविका नेत्रा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा बाबत महावितरणने कायमचा तोडगा काढावा, सध्या खंडित झालेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत व सुरळीत करण्यात यावा, अन्यथा एकाही अधिकाऱ्याला कार्यलयात येऊ दिले जाणार नाही, असा थेट इशारा नगरसेविका नेत्रा पाटील यांनी दिला आहे.

नगरसेविका नेत्रा पाटील

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »